Saturday, September 17, 2022

हैप्पी बर्थडे मोदीजी !

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना बहात्तराव्या वाढदिवसानिम्मत हार्दिक अभिनंदन आणि दीर्घ आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीने भारतासारख्या मोठ्या देशाच्या सर्वोच्च (जनप्रतिनिधित्वाच्या दृष्टीने) पदावर विराजमान होणे ही छोटी गोष्ट नव्हे . ती किमया मोदींनी करून दाखवली आहे. ते फक्त पंतप्रधान झाले नाहीत तर गेले  वर्ष देशाचे सक्षमरित्या नेत्तृत्व करीत आहेत. १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पुढे  वर्ष देशाचे नेतृत्व करण्याची मोदींनी जी किमया केली आहे त्याची स्वतंत्र भारतात तरी तोड नाही.स्वकर्तुत्वाने  कोणी व्यक्ती अशा सर्वोच्चपदावर पोहोचण्याचे आणि असे निर्विवाद नेतृत्व स्थापित करण्याचे दुसरे कुठले उदाहरण स्वतंत्र भारतात नाही. त्या अनुषंगाने मोदींना भारताचे सर्वोत्कृष्ट नेते म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . आता हे म्हंटल्यावर साहजिकच नेहेरु आणि इंदिरा गांधींचा विषय समोर येणारच . परंतु त्या दोघांना राजकीय वारसा प्राप्त होता. अर्थात वारसा असल्यामुळे त्यांचे कर्तृत्व आणि योगदान कमी होत नाही हे हि निश्चित. परंतु कुठलाही वारसा नसतांना,जनसामान्यातून कोणी एक व्यक्ती पुढे येतो आणि देशाचे नेतृत्व करतो या घटनेला विशेष महत्व आहे. भारतात लोकशाहीची पाळेमुळे रुजली आहेत का? या प्रश्नाला हे एक चोख उत्तर म्हणावे लागेल.अर्थात हे घडण्यामागे भाजपासारख्या तथाकथित 'फॅसिस्ट धार्जिण्या' पक्षाची सक्षम अंतर्गत लोकशाही कारणीभूत आहे हे ही विसरता कामा नये.गम्मत बघा - तथाकथित फॅसिस्ट पक्ष एका सामान्य व्यक्तीला पंतप्रधानपदापर्यंत नेऊन ठेवतो आणि दुसरीकडे भारतात लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या पक्षाचे नेतृत्व गेले २४ वर्षे एकाच व्यक्ती करीत आहे !

असोसगळ्यांप्रमाणे मोदींमध्येही गुणदोष आहेतचआणि वाढदिवस हा ते बाहेर काढण्याचा दिवस नाहीचांगल्या गोष्टींबद्दल बोलायचे तर मला जे अगदी प्रकर्षाने जाणविले त्याबद्दल लिहितो२००५ साली अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला.कोणा कोपऱ्यात पडलेल्या कायद्याच्या आधारे हे करण्यात आलेती एक प्रकारे नामुष्कीच म्हणावी लागेलतदनंतर अमेरिकेकडून अधिकृत आणि अनधिकृत रित्या मोदींना बऱ्याच निंदा नालस्तीला सामोरे जावे लागले.  फास्ट फॉरवर्ड - सन २०१३ साली भारत अमेरिकेचे संबंध अगदीच दुरावले होतेखटपट करून मनमोहन सिंग यांनी ज्या आण्विक कराराला रेटून धरले होते त्याचे काही भविष्य उरले नव्हतेभारत COMCASA कराराबद्दल पुढे जाण्यास धजावत नव्हताव्यापारी क्षेत्रतपण क्षमता असूनही फारशी प्रगती होत नव्हतीआणि हे सगळे कमी म्हणून कि काय - देवयानी खोबाग्रडे प्रकरण घडलेदेशात संतापाची लाट उठलीअशा पार्श्वभूवर मोदी भारताचे पंतप्रधान झालेआता मला सांगा - कुठल्याही सामान्य माणसाने काय केले असते ? आधीच ताणलेले संबंध त्यात तुमची झालेली वयक्तिक अवहेलनाअशा परिस्थितीचा फायदा घेऊन खुन्नस द्यायला पूर्ण वाव होताआणि 'देश कि इज्जतनावाखाली ते खपलेही असतेमोदींचे बहुमत आणि प्रसिद्धी पहाता ते निश्चितपणे शक्य होतेअशावेळी या माणसाने काय करावे ? तर स्वतःचा अपमान गिळून भारत-अमेरिकी संबंधांकडे विशेष लक्ष दिले आणि पूर्वपदावर आणलेराजकीय,सामरिक आणि व्यासायिक दृष्ट्या भारताला तेंव्हा अमेरिकेची गरज होती आणि मोदी हे ओळखून होतेतसे पहिले तर पारंपारिकरित्या भाजप आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सख्य नाहीकिंबहुना मोदींवर निर्बंध जरी बुश यांच्या कार्यकाळात लादले असतील तरी ओबामांनी ते हटवण्यास विरोधच केला होता .तसे असून सुद्धा मोदींनी ओबामांशी विशेष सलगी साधलीत्यांना प्रजसत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रिक केलेमानवाधिकाराबद्दल आणि एकात्मतेबद्दल मारलेल्या टोमण्यांना दुर्लक्षित केले.  थोडक्यात त्यावेळी मोदींनी राष्ट्रहितास सर्वाधिक प्राधान्य दिले.

फास्ट फॉरवर्ड २०२२भारत अमेरिकेचे संबंध अगदीच घट्ट झाले होतेट्रम्प आणि नंतर बिडेन यांच्याशी वयक्तिक संबंध जुळवण्यात मोदी यशस्वी झाले होते . तशात युक्रेन युद्ध पेटले .  युक्रेन युद्धात भारताने पाश्चिमात्य देशांचे समर्थन करावे ,रशियाशी दुरावा साधावा म्हणून अमेरिकेने खूप प्रयत्न केलेअनेक धमक्याही दिल्या गेल्या असतील पडद्याआडपरंतु मोदींनी घंटा भीक घातली नाहीउलट स्वस्तात मिळतंय म्हणून रशियाकडून अधिकाधिक तेल विकत घेऊन पाश्चिमात्य देशांना फाट्यावर बसविलेलक्षात घ्याजवळपास सगळे जग युक्रेन आणि त्यांना समर्थन करण्याऱ्या पाश्चिमात्य देशांच्या बाजूने होतेलडाख मध्ये आपला चीनशी तणाव सुरु आहेत्यात अमेरिकेची बरीच मदत भारताला होते आहेअशा परिस्थिती मोदींनी जर अमेरिकेच्या बाजूने कौल दिला असता तर कोणी काहीच बोलले नसतेपरंतु त्यांनी या सगळ्या संघर्षाचा फोलपणा ओळखून व्यवहारी दृष्टिकोन ठेवलादेशहित सर्वोच्च मानले.

मोदी आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करतात -पार झोपवून टाकतात असा त्यांच्यावर आरोप होतोतो खराही आहेपरंतु वयक्तिक दुराग्रह आणि अहंकार कुठे मध्ये आणायचा आणि कुठे सोडायचा हे त्यांना चांगलं कळतंयआणि म्हणूनच ते देशाचे सर्वउत्कृष्ट नेते आहेत असे आमचे ठाम मत आहे.

सुशांत गोसावी

Saturday, June 26, 2021

समाज माध्यमांतील वर्गभेद - एक ( अनावश्यक ) प्रबंध

             "काय बरेच दिवस काही पोस्ट नाही ? फेसबुक अकाऊंट बंद केले कि काय ? नाही म्हणजे आज काल बरेच जण बंद करतायत म्हणून विचारले "- एक मित्र- हो म्हणजे मित्रच म्हणायचे आता त्याला , विचारत होता .याला माझ्या पोस्ट लिहिण्याने अथवा लिहिण्याने काहीही फरक पडत नसणार. परंतु समोर भेटलेल्याला आपण सहज "काय झाले का जेवण " म्हणून विचारतो ना ? तसलाच प्रकार. समोरचा नाही म्हणाला तर लगेच "हो का ?अरेरे ! चला आमच्या घरी .जेवायला वाढतो " असे म्हणणारा अजून आम्हाला तरी भेटायचा आहे. बाकी एक गोष्ट मात्र तो बरोबर बोलला .आजकाल फेसबुक खाते बंद करायचे किंवा निष्क्रिय राहण्याचे नवीनच फॅड निघाले आहे. फेसबुकवर ऍक्टिव्ह असणे डाउन मार्केट समजले जाऊ लागले आहे. सोशल मीडियावरील "क्लास वॉर " मध्ये फेसबुक कधीही अव्वल नव्हतेच खरे. फेसबुक म्हणजे बॉलीवूड चा बी ग्रेड  गल्लेभरू चित्रपट. त्याला ना  कपूर चोप्रा ,खान नावांचे वलय आणि ना सत्यजित रे ,गोविंद निहलानी वगैरेंचे कर्तृत्व. फेसबुक म्हणजे चितळेंच्या पुण्यातील गल्लीतला कोणी भायल स्वीट्स. कितीही चांगला माल विकला तरी कायम तिसऱ्या नंबरवर. फेसबुक म्हणजे तुळशीबाग. व्हॅल्यू फॉर मनी तिथेच मिळते हे सगळेच जाणतात. परंतु तिथून खरेदी केली हे सांगायला कमीपणा वाटतो. तर इतर गोष्टींप्रमाणे सोशल मीडियावरही वर्ग भेद असतात बरं का ? म्हणजे मानवी स्वभावात असलेले भेद सोशल मीडियावर झळकतात असे म्हणू.

या सोशल क्लास वॉर्स मध्ये सर्वोच पदावर असतो तो लिंकडीन वापरणारा- किंबहुना लिंकडीन वरील सक्रिय गट. निव्वळ पेठेत राहण्याने जसा पुणेकरांना माज दाखविण्याचा मूलभूत अधिकार मिळतो, किंवा केवळ भारतीय असल्याकारणाने फूटभर ढेरीवाले सुद्धा  'योगा' वर आपला अधिकार सांगतात तसेच लिंकडीन वर साधा लाईक ठोकणारा सुद्धा पौरोहित्याचे अधिकार मिळवतो आणि "ऑल अदर सोशल मीडिया ईझ युझलेस" म्हणायला पात्र ठरतो. बरं नोकरी धंद्यासंदर्भात असल्याकारणाने लिंकडीन तसेही वलयांकित असणार यात शंका नाही. त्यात ( काही अपवाद वगळता ) कोणालाही कळणारे - निबंध टाकले ? कि तुम्ही जग जिंकलेच म्हणून समजा ! एखाद-दुसऱ्या उच्चपदावरील साहेबाचे  'कनेक्षन ' असेल आणि अनुमोदन मिळाले असेल तर विचारूच नका !  अर्थात केवळ आवड म्हणून त्या विषयांत रुची घेणारा असा एक अल्पसंख्य वर्ग आहे आणि त्यांचे विचार रंजक असतात. परंतु केवळ लिंकडीन वर वावरण्याने चार फूट हवेत चालणारे ( आणि इतरांना तुच्छ लेखणारे) "विद्वान" बरेच आहेत. हे हवेत चालत असल्याकारणाने भूतलावरील इतर माध्यमांशी स्पर्धा करण्याचा -किंबहुना विचारही करण्याचा काही संबंधच येत नाही. फेसबुक वगैरे म्हणजे तर यांच्यासाठी कुंटणखाना आहे. अर्थात यांच्या चोरून केलेल्या हरकती पाहून " हमको जो ताने देते हैं हम खोये हैं इन रंगरलियों मेंहमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में " या किशोरदांच्या ओळी आठवतात तो भाग वेगळा !

भूतलावरील माध्यमांचा विचार केला तर निर्विवाद वर्चस्व हे whatsapp  चे. यालाही पाण्यात पाहणारा वर्ग आहेच . परंतु whatsapp सगळ्यांच्याच आयुष्याचा आवश्यक घटक झाल्याकारणाने सरसकट बंद करण्याची हिम्मत दाखवणारा कोणी भेटला नाही ( म्हणजे whatsapp सोडून सिग्नल , टेलिग्राम वगैरे वापरणारे  तो वर्ग वेगळा. ते म्हणजे  रेड लेबल सोडून शिवाज रिगल घेणारे ). परंतु गम्मत बघा - गुणात्मक दृष्ट्या whatsapp आणि फेसबुक वरील "साहित्यात' ( आता साहित्यच म्हणायचे त्याला -दुसरे काय ?) काहीही फरक नसला तरी whatsapp वाले पण फेसबुक वाल्यांना पाण्यात बघतात बरं का ! दोघांचा मय बाप एकचं आहे हे माहित असून सुद्धा !  सच इझ क्लास कन्सेप्ट दीप रूटेड इन सोसायटी - काय सांगू तुम्हाला ! या नंतर येतात ते  ट्विटर वाले. यांचा फेसबुक वाल्यांशी तसा संघर्ष नसतो. म्हणजे ते वर्गभेद करीत नाहीत. परंतु ऋग्वेदी आणि यजुर्वेदींमध्ये जसा कर्मकांडाचा भेद असतो तसा ट्विटर आणि फेसबुकवाल्यांमध्ये असतो. दिवसातून १० वेळा चर चर करणारे  - 'अनलिमिटेड थाळी' लोक कशी खाऊ शकतात हे समजूच शकत नाहीत. आणि फेसबुक वाले  " फुल्ल थाळी का मज्जा तुम क्या जानो बाबूजी" करीत यांची मज्जा घेतात. परंतु केवळ  राजकीय दृष्ट्या वजनदार आणि संवेदनशील असल्याकारणाने ट्विटर वरच्या वर्गात स्थान मिळवते. या नंतर येतो तो इंस्टाग्राम. हे म्हणजे बाप से बेटा सवाई असा प्रकार आहे. परंतु नवीन पिढीला ते भावले आणि फोटो बघायला मिळत असल्याकारणाने अनेकांनी पार्टी बदलली . नव्या पिढतील तर गेलेच परंतु त्यांना पाहण्यासाठी म्हातारी धोंड पण मागोमाग पळाली . बाकी पिनारेस्ट ,कोरा वगैरे म्हणजे आपल्या प्रादेशिक पक्षांसारखे आहेत . ठरविक वर्गाला भावतात. परंतु फेसबुकला कमी लेखायला मागे पुढे पहात नाहीत.

असो तर थोडक्यात काय ( थोडक्यात काय ते सांगत जा हा फिडबॅक आज काल वारंवार मिळत चाललाय ) तर या वर्गीकरणात फेसबुक अगदी खालच्या तळाला आहे. बरं फेसबुक वापरणाऱ्यांच्यात  एकजूट असली तर नवल ! त्यांच्यात हजार पोटजाती! वर सांगितल्याप्रमाणे निष्क्रिय राहणारा एक मोठा गट आहे. यांना फेसबुक वापरणे म्हणजे डाउन मार्केट वाटते. परंतु इतरांच्या घरात काय चाललंय हे हळूचकन बघण्याची इच्छा जात नाही. त्यामुळे ते बघत सगळे असतात. प्रक्रिया मात्र देत नाहीत. त्यांच्या खालोखाल येतात ते फक्त लाईक्स ठोकणारे. मग फक्त आणि फक्त " हैप्पी बर्थडे " च्या शुभेच्छा देणारे. मग रोज उठून गुड मॉर्निंग म्हणणारे. देवी देवतांच्या फोटोला नमस्कार ठोकणारे, फेसबुक वरील राष्ट्रप्रेमी वगैरेंचा त्यानंतरचा क्रमांक.  कधीतरी उठून आठवले कि आपण फसेबूकवरही आहोत म्हणून  प्रोफाइल फोटो बदलणारे किंवा कोणालातरी उगाच " कसा आहेस लॉन्ग टाईम नो सी " वगैरे संदेश पाठविणारे मध्येच घुसतात. सरतेशेवटी उरतात ते प्रकारातील लोक . मोदीभक्त. हे सगळीकडेच असतात. परंतु ट्विटरवर मोजकेच शब्द लिहिता येतात! त्यामुळे फेसबुक हे यांचे हक्काचे स्थान. आणि प्रोटॉन असला कि इलेक्ट्रॉन हवाच ! या सिद्धांताप्रमाणे जेथे भक्त तेथे विरोधक आलेच ! त्यानंतर येतात ते -साहित्यिक. यांना त्यांच्या लिखाणाबद्दल फारच भाबड्या आशा असतात. त्यामुळे ते " मेरे करण अर्जुन आयेंगे " प्रमाणे कधीतरी मान आणि मान्यता मिळेल या आशेने झुंझ देत असतात. सर्वात खालचा नंबर लागतो तो फेसबुक पेज चा. हे पेजेस का आणि कोणासाठी बनलेली असतात कोण जाणे. परंतु उगाच वातावरण प्रदूषित करीत असतात. किंबहुना फेसबुकच्या अधःपतनात यांचा सर्वात मोठा वाटा आहे.  एवढे सगळे असूनही फेसबुक म्हणजे एस टी  सारखे आहे. आजही त्याच्या जीवावर प्रवास करणारे असंख्य " निष्ठावंत" आहेत !

परवा ही म्हणत होती- तुझा इंस्टग्राम प्रोफाइल बनव. मी म्हणालो नको मला. मी आपला फेसबुक वाल्या ओल्डीस मध्येच शोभतो. पूर्वी पत्र असायची मग फोन,-मेल आले. उद्या आणखी काही येईल. शेवटी काय ? लिंकडीन असो अगर इंस्टाग्राम माणसं जोडलेली असणे  महत्वाचं. नाही का ?