भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना बहात्तराव्या वाढदिवसानिम्मत हार्दिक अभिनंदन आणि दीर्घ आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीने भारतासारख्या मोठ्या देशाच्या सर्वोच्च (जनप्रतिनिधित्वाच्या दृष्टीने) पदावर विराजमान होणे ही छोटी गोष्ट नव्हे . ती किमया मोदींनी करून दाखवली आहे. ते फक्त पंतप्रधान झाले नाहीत तर गेले ८ वर्ष देशाचे सक्षमरित्या नेत्तृत्व करीत आहेत. १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पुढे ८ वर्ष देशाचे नेतृत्व करण्याची मोदींनी जी किमया केली आहे त्याची स्वतंत्र भारतात तरी तोड नाही.स्वकर्तुत्वाने कोणी व्यक्ती अशा सर्वोच्चपदावर पोहोचण्याचे आणि असे निर्विवाद नेतृत्व स्थापित करण्याचे दुसरे कुठले उदाहरण स्वतंत्र भारतात नाही. त्या अनुषंगाने मोदींना भारताचे सर्वोत्कृष्ट नेते म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . आता हे म्हंटल्यावर साहजिकच नेहेरु आणि इंदिरा गांधींचा विषय समोर येणारच . परंतु त्या दोघांना राजकीय वारसा प्राप्त होता. अर्थात वारसा असल्यामुळे त्यांचे कर्तृत्व आणि योगदान कमी होत नाही हे हि निश्चित. परंतु कुठलाही वारसा नसतांना,जनसामान्यातून कोणी एक व्यक्ती पुढे येतो आणि देशाचे नेतृत्व करतो या घटनेला विशेष महत्व आहे. भारतात लोकशाहीची पाळेमुळे रुजली आहेत का? या प्रश्नाला हे एक चोख उत्तर म्हणावे लागेल.अर्थात हे घडण्यामागे भाजपासारख्या तथाकथित 'फॅसिस्ट धार्जिण्या' पक्षाची सक्षम अंतर्गत लोकशाही कारणीभूत आहे हे ही विसरता कामा नये.गम्मत बघा - तथाकथित फॅसिस्ट पक्ष एका सामान्य व्यक्तीला पंतप्रधानपदापर्यंत नेऊन ठेवतो आणि दुसरीकडे भारतात लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या पक्षाचे नेतृत्व गेले २४ वर्षे एकाच व्यक्ती करीत आहे !
असो. सगळ्यांप्रमाणे मोदींमध्येही गुणदोष आहेतच. आणि वाढदिवस हा ते बाहेर काढण्याचा दिवस नाही. चांगल्या गोष्टींबद्दल बोलायचे तर मला जे अगदी प्रकर्षाने जाणविले त्याबद्दल लिहितो. २००५ साली अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला.कोणा कोपऱ्यात पडलेल्या कायद्याच्या आधारे हे करण्यात आले. ती एक प्रकारे नामुष्कीच म्हणावी लागेल. तदनंतर अमेरिकेकडून अधिकृत आणि अनधिकृत रित्या मोदींना बऱ्याच निंदा नालस्तीला सामोरे जावे लागले. फास्ट फॉरवर्ड - सन २०१३ साली भारत अमेरिकेचे संबंध अगदीच दुरावले होते. खटपट करून मनमोहन सिंग यांनी ज्या आण्विक कराराला रेटून धरले होते त्याचे काही भविष्य उरले नव्हते. भारत COMCASA कराराबद्दल पुढे जाण्यास धजावत नव्हता. व्यापारी क्षेत्रतपण क्षमता असूनही फारशी प्रगती होत नव्हती. आणि हे सगळे कमी म्हणून कि काय - देवयानी खोबाग्रडे प्रकरण घडले. देशात संतापाची लाट उठली. अशा पार्श्वभूवर मोदी भारताचे पंतप्रधान झाले. आता मला सांगा - कुठल्याही सामान्य माणसाने काय केले असते ? आधीच ताणलेले संबंध त्यात तुमची झालेली वयक्तिक अवहेलना. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन खुन्नस द्यायला पूर्ण वाव होता. आणि 'देश कि इज्जत' नावाखाली ते खपलेही असते. मोदींचे बहुमत आणि प्रसिद्धी पहाता ते निश्चितपणे शक्य होते. अशावेळी या माणसाने काय करावे ? तर स्वतःचा अपमान गिळून भारत-अमेरिकी संबंधांकडे विशेष लक्ष दिले आणि पूर्वपदावर आणले. राजकीय,सामरिक आणि व्यासायिक दृष्ट्या भारताला तेंव्हा अमेरिकेची गरज होती आणि मोदी हे ओळखून होते. तसे पहिले तर पारंपारिकरित्या भाजप आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सख्य नाही. किंबहुना मोदींवर निर्बंध जरी बुश यांच्या कार्यकाळात लादले असतील तरी ओबामांनी ते हटवण्यास विरोधच केला होता .तसे असून सुद्धा मोदींनी ओबामांशी विशेष सलगी साधली. त्यांना प्रजसत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रिक केले. मानवाधिकाराबद्दल आणि एकात्मतेबद्दल मारलेल्या टोमण्यांना दुर्लक्षित केले. थोडक्यात त्यावेळी मोदींनी राष्ट्रहितास सर्वाधिक प्राधान्य दिले.
फास्ट फॉरवर्ड २०२२. भारत अमेरिकेचे संबंध अगदीच घट्ट झाले होते. ट्रम्प आणि नंतर बिडेन यांच्याशी वयक्तिक संबंध जुळवण्यात मोदी यशस्वी झाले होते . तशात युक्रेन युद्ध पेटले . युक्रेन युद्धात भारताने पाश्चिमात्य देशांचे समर्थन करावे ,रशियाशी दुरावा साधावा म्हणून अमेरिकेने खूप प्रयत्न केले. अनेक धमक्याही दिल्या गेल्या असतील पडद्याआड. परंतु मोदींनी घंटा भीक घातली नाही. उलट स्वस्तात मिळतंय म्हणून रशियाकडून अधिकाधिक तेल विकत घेऊन पाश्चिमात्य देशांना फाट्यावर बसविले. लक्षात घ्या. जवळपास सगळे जग युक्रेन आणि त्यांना समर्थन करण्याऱ्या पाश्चिमात्य देशांच्या बाजूने होते. लडाख मध्ये आपला चीनशी तणाव सुरु आहे. त्यात अमेरिकेची बरीच मदत भारताला होते आहे. अशा परिस्थिती मोदींनी जर अमेरिकेच्या बाजूने कौल दिला असता तर कोणी काहीच बोलले नसते. परंतु त्यांनी या सगळ्या संघर्षाचा फोलपणा ओळखून व्यवहारी दृष्टिकोन ठेवला. देशहित सर्वोच्च मानले.
मोदी आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करतात -पार झोपवून टाकतात असा त्यांच्यावर आरोप होतो. तो खराही आहे. परंतु वयक्तिक दुराग्रह आणि अहंकार कुठे मध्ये आणायचा आणि कुठे सोडायचा हे त्यांना चांगलं कळतंय. आणि म्हणूनच ते देशाचे सर्वउत्कृष्ट नेते आहेत असे आमचे ठाम मत आहे.
सुशांत गोसावी
No comments:
Post a Comment