सुशांत सिंग मृत्यू च्या चौकशीचे प्रकरण एखाद्या मसाला बॉलीवूड चित्रपटापेक्षाही नाट्यमय होत चालले आहे. जसे मसाला चित्रपटात प्रेम ,बदला ,हिंसा ,सेक्स ,विनोद ,अमली पदार्थ किंवा तस्करी असे विविध घटक असतात तसेच या चौकशी चे ही झाले आहे. सुरुवातीला नैराश्यामुळे आत्महत्या म्हणून सुरु झालेल्या या प्रकरणात पुढे नेपोटिसम मुळे नैराश्य आले आणि म्हणून आत्महत्या असा शोध लागला - आणि पर्यायाने बॉलीवूडच्या प्रस्थपतींना दोषी ठरविले गेले , नंतर ही आत्महत्या नव्हे तर खून आहे हा 'शोध' लागला आणि त्यासाठी त्याच्या कथित गर्लफ्रेंडला दोषी ठरविले गेले. तीचे अन्य कोणाशी असलेले 'संबंध' बाहेर आले. या प्रकरणाला मध्येच राजकीय रंग आला आणि कोणा राजकीय नेत्याचा संबंध असल्याचेही बोलले जाऊ लागले.बरं हे सगळे बिहार निवडणुकांमुळे चालले आहे असा ही आरोप करण्यात आला. मधल्यामध्ये सुशांतच्या कुटुंबातील कथित भानगडी पण चव्हाट्यावर आणण्यात आल्या. सी बी आय चौकशी बद्दल तर इतके नाट्य रंगले कि जणू परदेशी एफ बी आय ला चौकशीला बोलावतायत कि काय असा प्रश्न पडेल. आणि ती मान्य झाल्यावर अनेकांना असा आनंद झाला कि जणू दोन दिवसात मुख्य आरोपी पकडला जाईल आणि खटला चालेल.मधल्या मध्ये दूरचित्रवाणी कर्मचाऱ्यांची कथित मारहाण पण झाली. परंतु इतके सारे झाल्यावरही सुशांतचा मृत्यू कसा झाला हे मात्र कोडेच राहिले.
बर
हा तर चित्रपटाचा पूर्वार्ध
होता. इथपर्यंत चित्रपट निदान कथेला धरून होता. सगळ्या
गोष्टी सुशांतच्या मृत्यूशी संबंधित होत्या. उत्तरार्धात चित्रपट वाईट घसरला. कोणाला
मुंबईत असुरक्षित वाटू लागले तर
कोणाला अचानक आपल्या कर्तव्याची जाण येऊन रातोरात
अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. एका चित्रपट
अभिनेत्याच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणाने 'देश प्रेमी आणि
देश द्रोही ' असे वळण केंव्हा
घेतले ( किंवा देण्यात आले ) हे कोणालाच कळले
नाही .हे म्हणजे जाना
था जपान पाहूंच गये
चीन ,तशातले झाले. लोकही येड्यासारखे बघतायत आणि चर्चा करतायत.
या पुढे तर
चित्रपटाने वेगळेच वळण घेतले आहे.
मुख्य मुद्दा राहिला बाजूला आणि देशप्रेम वगैरे
पण अलगदरित्या गेले खड्ड्यात. काय
तर म्हणे बॉलीवूडमधील आमली पदार्थांचे सेवन
आणि त्यात कोण कोण सामील
आहे. सुशांत कथितरित्या आमली पदार्थांचे सेवन
करीत आणि त्याची मैत्रीण
ते कथित रित्या पुरवतअसल्यामुळे
हा अँगल येणे एक
प्रकारे सहाजिक आहे. परंतु त्याचा
मृत्यूशी काय संबंध ? आणि
असला तर त्यादृष्टी ने
तपस करा. कोण कोण
ड्रग्स घेतात हे रोज हेड
लाईन म्हणून छापून येते आहे. कोणाला पडली आहे ? बेकायदा
,अनैतिक ,अनधिकृत आणि त्याज्य गोष्टी
बॉलीवूडमध्ये नव्या नाहीत. पिढ्यानपिढ्या त्या चालत आलेल्या
आहेत . इतरत्र समाजातही त्या चालतातच. ड्रग्स
घेणे हे काही गेल्या
दोन-चार वर्षांचे प्रकरण
निश्चित नाही. ते बेकायदा असेल
तर त्याची सखोल आणि निष्पक्ष
चौकशी जरूर करा. परंतु
एवढा बागुलबुवा कशाला
? काल पुण्यातील हिंजेवाडीत कित्येक किलो गांजा जप्त
झाला. ते ही तितकेच
बेकायदा आहे ! किती चर्चा झाली
त्याची ?
आता
या सगळ्यातील आमचा आक्षेप काय
? तर - मृत्यूतील चौकशी मागील कथित राजकारण जे
असेल ते असेल. आम्हाला
काही घेणे देणे नाही
. याचा अर्थ कळत नाही
असे निश्चित नाही बरं का! यह
पब्लिक है यह सब
जानती है! परंतु या
चित्रपटाला जे वेगळे वळण
दिले जातंय आणि त्याचा समाजावर
जो संभावित परिणाम होणार- ते आमच्या चिंतेचे
कारण आहे. जे काही
ड्रग्स बद्दलचे whatsapp मेसेज
लीक होतायत ते कोण करतंय
? का करतंय ? आरोपी तर निश्चित करणार
नाहीत होय ना ? मग
जाणून बुजून एवढी चर्चा का
रंगवली जाती आहे ? काय
साध्य होणार त्यातून ? चौकशी गोपनीयरित्याही करता येते. मग
एवढा तमाशा कशाला ? जे नट नट्या यात
कथितरित्या गुंतलेले आहेत , ते अनेक युवक
-युवतींच्या गळ्यातील
ताईत आहेत. ते वयाचं तसे
असते. आता आपला आवडता
नट किंवा नटी ड्रग्स घेतात
हे कळल्यावर या फॅन्सचा हिरमोड
होईल आणि ते यांना
फॉलो करणे सोडतील अशी
अपेक्षा आहे . तसे झाले तर
उत्तमच. परंतु आपल्या आवडत्या नट -नात्यांमुळे हे
तरुण ड्रग्सकडे आकर्षित झाले तर ? कोण
जवाबदार राहणार ? बॉलीवूड साफ करण्याच्या नाटकापायी
आपण त्यातील घाण समाजात पसरवत
आहोत याची जाणीव आहे
का कर्त्यांना ? कीआपल्या
क्षणिक राजकारणासाठी आणि चॅनेल्सच्या प्रसिद्धीसाठी
आपण समाजाचे किती मोठे नुकसान
करतोय,किती तरुणांच्या जीवाशी
खेळतोय याची फिकिरीच नाही या निर्लज्जनां ? घरातील सगळीच घाण चव्हाट्यावर आणून जगाला
दाखवायची नसते. बरेचदा ती पुडीत बांधून गुपचूप कचरा कुंडीत टाकून यायची असते. कोणालातरी
सद्बुद्धी सुचेल आणि हे लवकरच
थांबेल ही अपेक्षा करूया.
आणि
एवढे सगळे करूनही " सुशांत
सिंग को किसने मारा
" या चित्रपटाचा अंत कधीही बाहेर
येणार नाही याची आम्हाला
खात्री आहे असे दुर्दैवाने
म्हणावे लागेल.