काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मुलगा ४ वर्षांचा होता आणि त्याला भयंकर खोकला झाला. डॉक्टर च्या २ फेऱ्या झाल्या तरी कमी होईना. शेवटी डॉक्टरने न्यूमोनिया टेस्ट्स करायला सांगितल्या - एक्स रे आणि रक्त चाचणी. आता पर्यंत डॉक्टर सांगतील त्या लशी आम्ही देत आलो होतो. उगाच गूगल करून त्याचे तोटे फायदे ,साईड इफेक्ट्स वगैरे बघण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. परंतु मुलाला न्यूनोमिया च्या एक नाही तर ३ लशी दिल्याचे मला चांगलेच आठवते. बरं त्या पण याच डॉक्टर कडे. म्हणून सहजच त्यांना प्रश्न विचारला कि आपण तर लस दिली होतो - त्या पण तीन ? तर म्हणाले कि तरीही न्यूमोनिया होऊ शकतो. कुठल्याही लसीचा सक्सेस रेट हा ८५-९५ टक्के असतो. मनात विचार आला - अहो नव्वद टक्के सक्सेस रेट चांगला आहे. पण मला एकच मुलगा आहे ! जर त्या महागड्या लशी देऊन त्याला न्यूमोनिया होणार असेल आणि लस देताना हे माहित नसेल तर लस देणे म्हणजे अंधश्रद्धाच म्हणायला हवी ना ? सुदैवाने ( लसीमुळे किंवा दैवामुळे ) टेस्ट नेगेटिव्ह आल्या आणि विषय तिथेच थांबला. पुढे अमेरिकेत गेल्यावर फ्लू च्या लशी प्रत्येक वर्षी घेण्याची प्रथा आहे. हो प्रथाच म्हणायचे त्याला ! २०१८-१९ च्या फ्लू सिझन मध्ये तब्बल चौतीस हजार जणांना फ्लूमुळे आपला प्राण गमवावा लागला होता. त्यातील किती जणांनी लस घेतली हे माहित नाही. परंतु मुद्दा असा कि लस उपलब्ध असून सुद्धा इतक्या जणांना प्राण गमवावा लागला. अर्थात यात बऱ्याच आणखी भानगडी असतील. परंतु कागदी 'डेटा' हेच सांगतो कि चौतीस हजार जणांनी फ्लूमुळे प्राण गमावला. आता या लशीला विज्ञान म्हणायचे कि श्रद्धा कि अंधश्रद्धा ? बाय द वे ,मी हि लस घेण्याच्या भानगडीत कधी पडलो नाही. आणि सुदैवाने ( हो दैवाने ) फ्लू झाला नाही.
कोरोनाचे थैमान सुरु झाल्यापासून त्याला रोखण्यासाठी अथवा इलाज करण्यासाठी अनेक उपाय सुचविले जात आहेत. त्यासाठी अनेक सर्वे केले जातात आणि रोज नवनवीन विश्लेषण समोर येत आहेत. आधुनिक वैदकीय प्रणालीबद्दल सांगायचे झाल्यास हैड्रोक्लोरॉक्सिन हे मलेरिया चे औषध,एड्स वरची औषधे इत्यादींचा प्रगोय होतोय. त्याच बरोबर चक्क व्हिटॅमिन ड चे सर्व्ह पण आशादायक परिणाम देत आहेत ! म्हणजे कोरोनाग्रस्तांना भर उन्हात ठेवा आता ! एका सर्वेक्षणात तर असे समोर आले कि धूम्रपान करण्याऱ्यांचे प्रमाण कोरोनाग्रस्तांमध्ये तुलनेने कमी आढळते ! आपल्याकडचे बोलायचे झाले तर- कोरोनाचा उपद्रव सुरु झाल्यापासून अनेक थिअऱ्या समोर आल्या. आपल्याकडे उष्णता असल्यामुळे होणारच नाही , भारतीयांना 'बी सी जी' लस दिल्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल ,हर्ड इम्म्युनिटी, थाळी घंटानाद केल्यामुळे सूक्ष्म लहिरींनी कोरोना पळून जाईल(!!) , करोडोंनी प्रार्थना केल्यामुळे जी 'पॉसिटीव्ह एनर्जी ' निर्माण होते त्यामुळे पळून जाईल ,लसूण,आले खाल्ल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल, शाकाहारींना होणारच नाही इत्यादी अनेक 'उपाय' आणि कल्पना समोर आल्या. काही भ्रामक तर काही सत्याच्या थोड्या जवळ. परंतु पूर्ण सत्य असे काहीच नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेचा (अथवा अंधश्रद्धेचा ) भाग. इतकेच काय ? तर - दारू पिल्यामुळे कोरोना मारून जातो हा शोधही कोणा शहाण्याने लावला ! दारू दुकानांसमोर म्हणूनच रांगा लागल्या होत्या बहुतेक! अर्थात 'जनरल इम्म्युनिटी' वाढविणारे अनेक उपाय पण सांगितले जातात- प्राणायाम करणे , फळे खास करून व्हिटॅमिन क -युक्त खाणे , व्यायाम इत्यादी. सध्या 'आरसेनिक अल्बम ३०' या होमिओपॅथिक औषधाचे खूळ सुरु आहे. हे घेण्याने कोरोना होणारच नाही असे सिद्ध झाले आहे का ? तर निश्चित नाही. आणि आधुनिक वैदकीय शास्त्र याला कधीच मान्यता देणार नाही. म्हणजे हे औषध घेऊन जरी तुम्हाला कोरोना अथवा सर्दी खोकला -ताप नाही आला तरी तो या औषधामुळे हे ते कधीच मान्य करणार नाहीत.
मग प्रश्न असा निर्माण होतो कि या उपायांबद्दलचे तथ्य काय ? तर उत्तर आहे -सध्यातरी काहीच नाही. या कल्पना आहेत. श्रद्धा -कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणतील. म्हणून उपाय करणे थांबवायचे का ? अर्थातच नाही. उद्या जरी लस आली तरी त्याचा सक्सेस रेट किती ? आणि कोण ठरवणार ? आणि तो या तथाकथित अंधश्रद्धांच्या तुलनेत कुठे बसणार ? समजा जरी लसीने सुयोग्य असे परिणाम दिले तरी ती यायला आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचायला किमान ८-१० महिने अवकाश आहे. या दरम्यान जितके स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे तितकेच मानसिक सुद्धा. आणि कुठलाही उपाय( प्रयोग) तुम्हाला इजा ना पोहोचवता आणि आर्थिक नुकसान न पोचवता होत असेल आणि त्याने तुम्हाला मनःशांति मिळत असेल तर करायला काहीच हरकत नाही. 'यु नेव्हर नो' ! वास्तव -श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा फार पुसत असतात ! अर्थात हे सर्व करीत असतांना ,आपण हे केले आणि ते केले म्हणून आपल्याला कोरोना होणारच नाही या भ्रमात राहणे मात्र धोक्याचे ठरेल . त्यामुळे, खबरदारी घ्या , सरकारने नियम दिलेत त्याप्रमाणे बाहेर पडा ( कधी कधी जरूर पडा - गुड फॉर युअर मेंटल हेल्थ ) आणि आपल्याला रास्त वाटतील असे उपाय करीत रहा. विजय निश्चित आहे.
टिप : लेखक वैदकीय शास्त्रातील पदवीधर नाही. त्यामुळे शंका असल्यास आप-आपल्या वैदू,हकीम,डॉक्टर अथवा टीव्ही चॅनेल वाल्यांना विचारावे.
कोरोनाचे थैमान सुरु झाल्यापासून त्याला रोखण्यासाठी अथवा इलाज करण्यासाठी अनेक उपाय सुचविले जात आहेत. त्यासाठी अनेक सर्वे केले जातात आणि रोज नवनवीन विश्लेषण समोर येत आहेत. आधुनिक वैदकीय प्रणालीबद्दल सांगायचे झाल्यास हैड्रोक्लोरॉक्सिन हे मलेरिया चे औषध,एड्स वरची औषधे इत्यादींचा प्रगोय होतोय. त्याच बरोबर चक्क व्हिटॅमिन ड चे सर्व्ह पण आशादायक परिणाम देत आहेत ! म्हणजे कोरोनाग्रस्तांना भर उन्हात ठेवा आता ! एका सर्वेक्षणात तर असे समोर आले कि धूम्रपान करण्याऱ्यांचे प्रमाण कोरोनाग्रस्तांमध्ये तुलनेने कमी आढळते ! आपल्याकडचे बोलायचे झाले तर- कोरोनाचा उपद्रव सुरु झाल्यापासून अनेक थिअऱ्या समोर आल्या. आपल्याकडे उष्णता असल्यामुळे होणारच नाही , भारतीयांना 'बी सी जी' लस दिल्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल ,हर्ड इम्म्युनिटी, थाळी घंटानाद केल्यामुळे सूक्ष्म लहिरींनी कोरोना पळून जाईल(!!) , करोडोंनी प्रार्थना केल्यामुळे जी 'पॉसिटीव्ह एनर्जी ' निर्माण होते त्यामुळे पळून जाईल ,लसूण,आले खाल्ल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल, शाकाहारींना होणारच नाही इत्यादी अनेक 'उपाय' आणि कल्पना समोर आल्या. काही भ्रामक तर काही सत्याच्या थोड्या जवळ. परंतु पूर्ण सत्य असे काहीच नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेचा (अथवा अंधश्रद्धेचा ) भाग. इतकेच काय ? तर - दारू पिल्यामुळे कोरोना मारून जातो हा शोधही कोणा शहाण्याने लावला ! दारू दुकानांसमोर म्हणूनच रांगा लागल्या होत्या बहुतेक! अर्थात 'जनरल इम्म्युनिटी' वाढविणारे अनेक उपाय पण सांगितले जातात- प्राणायाम करणे , फळे खास करून व्हिटॅमिन क -युक्त खाणे , व्यायाम इत्यादी. सध्या 'आरसेनिक अल्बम ३०' या होमिओपॅथिक औषधाचे खूळ सुरु आहे. हे घेण्याने कोरोना होणारच नाही असे सिद्ध झाले आहे का ? तर निश्चित नाही. आणि आधुनिक वैदकीय शास्त्र याला कधीच मान्यता देणार नाही. म्हणजे हे औषध घेऊन जरी तुम्हाला कोरोना अथवा सर्दी खोकला -ताप नाही आला तरी तो या औषधामुळे हे ते कधीच मान्य करणार नाहीत.
मग प्रश्न असा निर्माण होतो कि या उपायांबद्दलचे तथ्य काय ? तर उत्तर आहे -सध्यातरी काहीच नाही. या कल्पना आहेत. श्रद्धा -कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणतील. म्हणून उपाय करणे थांबवायचे का ? अर्थातच नाही. उद्या जरी लस आली तरी त्याचा सक्सेस रेट किती ? आणि कोण ठरवणार ? आणि तो या तथाकथित अंधश्रद्धांच्या तुलनेत कुठे बसणार ? समजा जरी लसीने सुयोग्य असे परिणाम दिले तरी ती यायला आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचायला किमान ८-१० महिने अवकाश आहे. या दरम्यान जितके स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे तितकेच मानसिक सुद्धा. आणि कुठलाही उपाय( प्रयोग) तुम्हाला इजा ना पोहोचवता आणि आर्थिक नुकसान न पोचवता होत असेल आणि त्याने तुम्हाला मनःशांति मिळत असेल तर करायला काहीच हरकत नाही. 'यु नेव्हर नो' ! वास्तव -श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा फार पुसत असतात ! अर्थात हे सर्व करीत असतांना ,आपण हे केले आणि ते केले म्हणून आपल्याला कोरोना होणारच नाही या भ्रमात राहणे मात्र धोक्याचे ठरेल . त्यामुळे, खबरदारी घ्या , सरकारने नियम दिलेत त्याप्रमाणे बाहेर पडा ( कधी कधी जरूर पडा - गुड फॉर युअर मेंटल हेल्थ ) आणि आपल्याला रास्त वाटतील असे उपाय करीत रहा. विजय निश्चित आहे.
टिप : लेखक वैदकीय शास्त्रातील पदवीधर नाही. त्यामुळे शंका असल्यास आप-आपल्या वैदू,हकीम,डॉक्टर अथवा टीव्ही चॅनेल वाल्यांना विचारावे.