टीप
- हा राजकीय लेख आहे.
मागील लेखात जे मी म्हणालो ( दोन भयंकर प्रश्न ) ते आज राहुल गांधी स्वतःच बोलले. म्हणे 'करियर'
बुडाले तरी बेहेत्तर पण
'खरे' बोलणे सोडणार नाही. त्यांचे एक वेळ ठीक
आहे हो . पण पक्षाचे
काय ? हे म्हणजे 'हम
तो डुबेंगे सनम तुमको भी
ले डुबेंगे ' अशातला प्रकार आहे. राहुल गांधींनी
कुठले राजकारण कसे करायचे हा
त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्यात
काँग्रेसची फरफट कशाला ? असंख्य
काँग्रेस जण आपले सरकार
येण्यासाठी झटतायत. आणि का झटू
नये ? जसे फायदा होणे
हा धंद्याचा मूलभूत सिद्धांत आहे तसेच निवडणुका
जिंकून आपले सरकार येणे
आणि आपली नीती राबविणे
हा कुठल्याही राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि कर्तव्य
सुद्धा . आपल्याकडे "काँग्रेस मुक्त भारत " च्या आरोळ्या ठोकणारे
बरेच आहेत. आणि ती कल्पना
सत्यात आल्याने भारताची भरभराट होईल -आपल्या सगळ्या समस्या सुटतील असे समजणारे तर
त्याहून अधिक. त्या हिशोबाने अगदी
शून्य नाही पण काँग्रेसचे
फक्त ४०-५० खासदार
असतांना आपली बऱ्यापैकी प्रगती
व्हायला पाहिजे होती-नाही का
? पण तो वेगळा विषय
आहे.
काँग्रेस
मुक्त भारत झाला तरी
काही हरकत नाही हो.परंतु एक लक्षात ठेवा-
बावन्न खासदार असूनही आज काँग्रेसच लोकसभेत
सर्वात मोठा विरोधी पक्ष
आहे. आणि भारतात सध्यातरी
भाजप आणि काँग्रेस सोडले
तर देशव्यापी असा दुसरा कुठलाही
पक्ष नाही. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले 'राष्ट्रीय पक्ष' बरेच आहेत. परंतु
त्यांची आपल्या राज्यापलीकडे पोच नाही किंवा
अगदी नगण्य आहे . विविध राज्यातील लोकसभेच्या जागा पाहता आणि
संभावित पक्षीय बलाबलाचा अंदाज घेता - काँग्रेस सोडली तर फक्त उत्तर
प्रदेश (८५ जागा
), महाराष्ट्र ( ४८ जागा ) आणि
पश्चिम बंगाल ( ४२ जागा) इथूनच
प्रबळ दावेदार पुढे येऊ शकतात.
त्यात महाराष्ट्रात कमीत कमी चौकोनी
लढाई होत असते. आपले
दादरवाले झोपलेले असतात ना? त्यामुळे अगदी
मोठी उडी मारली तरी
भाजप -काँग्रेस सोडल्यास तिसऱ्या पक्षाला फार फार तर
२५-३० जागा मिळतील.
तीच गत उत्तर प्रदेशाची
- योगींची किमया ,भाजपचा प्रभाव ओसरला असे समजले तरी
दुसरा कुठलाही पक्ष ५०-५५
जागांपेक्षा जास्त मिळवू शकत नाही. पश्चिम
बंगाल मध्ये भाजप जोर पकडतोय.
शिवाय कम्युनिस्ट कदाचित पुन्हा डोके वर काढतीलाच.
अशा परिस्थितीत तृणुमुल ला ३० जागा
मिळाल्या तरी विजयच समजायचा.
म्हणजे पुढील काळात भाजपचे सरकार आले तर विरोधात
असणारा सर्वात मोठा पक्ष ( काँग्रेस
मुक्त झाल्यास ) हा ४०-६०
खासदार असलेला असेल ( गेले ६ वर्ष
तीच गत आहे म्हणा).
आणि जर समजा भाजप
सरकार स्थापन करू नाही शकला
तर पुन्हा ५० जागा असलेला
पक्ष त्या तथाकथित आघाडीतील
सर्वात मोठा पक्ष असेल.
५० खासदार असलेल्या पक्षाचा नेता २७२ खादारांचे
'समर्थन' दाखवून सरकार बनविणार. या आधीपण आपण
असली खिचिडी सरकारं अनुभवली आहेत. किती टिकली माहीतच
आहे. बरं तेंव्हा तर
सर्वात मोठ्या पक्षाला निश्चितच शंभरापेक्षा जास्त जागा होत्या. तरीही
दोन वर्षांच्या वर कुठलेही सरकार
टिकले नाही.
देशाच्या
प्रगतीसाठी एक स्थिर सरकार
असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच लोकशाही
प्रबळ करण्याकरिता एक सशक्त आणि
सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे
आहे. एकहाती सत्ता कधीच चांगली नाही
. मग ते मोदी असोत
कि आणखी कोणी. ती
एक म्हण आहे ना
-"Power Corrupts. And absolute power corrupts absolutely". इथे करप्शन चा
अर्थ हा फक्त भ्रष्टाचार
असा न घेता अनिर्बंध
कारभार असा घ्यावा. उदाहरणे
बरीच आहेत. पुतीन घ्या किंवा तुर्कीस्तानचे
एरोगन घ्या . मतितार्थ असा कि एकहाती
सत्ता आणि ती पण
सक्षम विरोधी पक्षा आभावी देशासाठी आणि लोकशाही साठी
महाघातक ठरत असते. मग
यातून मार्ग काय ? अगदी असे समजले
कि भारतातील १०-१५ पक्षांनी
स्वतःला एका
मोठ्या पक्षात 'विलीन' केले तरीही नेत्यांचे
वयक्तिक हेवेदावे हे राहणारच. म्हणजे
विरोधात असले तर फोडणे
शक्य आणि सरकारात असले
तर स्थिरतेला धोका. तत्वांवर आणि समान विचारधारेवर
आधारित एका नवीन पक्षाची
स्थापना हा मार्ग असू
शकतो. परंतु त्याला भयंकर संयम लागतो. क्षणिक
फायद्याचा विचार केला तर फार
पल्ला गाठणे कठीण जाते. आम
आदमी पक्षासारखे . आणि समजा जरी
असा पक्ष उदयास आला
तरी राष्ट्रीय स्थरावर प्राबल्य मिळवायला त्यांना १५-२० वर्ष
लागतील. भाजप हा संयमी
आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. आणि
त्यांना एक नैतिक अधिष्ठान
आहे ( तुम्ही माना अगर नका
मानू ). त्यामुळे त्यांच्यात मोठी फूट पडेल
आणि तो फुटीर गट
फार काळ तग धरेल
असे वाटत नाही. मग
पर्याय काय उरतो ? तर
काँग्रेसचे पुनरुत्थान किंवा सक्षमीकरण. गांधीरहित काँग्रेस कदचित टिकेल किंवा टिकणारही नाही. बरं तो गांधीरहित
असेल किंवा असावा असेही नाही . परंतु काँग्रेस पुन्हा 'रुळावर'यायला वाव जरूर आहे.
आणि राहुल गांधी ती रुळेच एक एक करून
उखडून टाकतायत. का तर 'मी
म्हणतो ते आणि तेच
खरे" या अहंकाराकरिता. उरलेल्या
काँग्रेसजनांनी एकत्र येऊन उठाव करण्याची
हीच ती वेळ आहे.
नाही तर राहुल जाईल
निघून कंबोडियात आणि बाकीचे बसतील
टाळ पिटत. स्वतःकरिता ,देशाकरिता आणि लोकशाहीकरिता हे
काँग्रेसजनांनो वेळीच जागे व्हा !काँग्रेससातील
'आत्मा' आणि स्वाभिमान गेले
अनेक वर्षात पद्धतशीरपणे संपविण्यात आला आहे हे आम्ही
जाणून आहोत . तरीही आम्हाला
वाटते म्हणून लिहिले. बाकी तुम्ही ,तुमचा
पक्ष आणि तुमचे नशीब
...
राहता राहिला
प्रश्न " सत्याचा" . तर राहुल 'सत्य सांगतच नाही आहेत . ते त्यांच्या दृष्टिकोनातून
'वास्तव' सांगतायत. आणि वास्तवाला अनेक बाजू असतात. आणि ते बदलते. राजकारणात त्यालाच
मुत्सद्देगिरी म्हणतात. There is difference between Truth and reality. Truth is
absolute and perennial. Reality has multiple faces and is ever changing.