राजस्थानातील गेहेलोत समर्थक 85-90 आमदारांनी एकत्रितपणे राजीनामा दिला हे काही स्वतः गेहेलोत यांची संमती आणि आशीर्वाद असल्याखेरीज शक्य नाही. अर्थात गेहेलोत यांनीच हे सगळे घडवून आणले आहे यात काडीमात्र शंका नाही. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनाण्यापासून रोखण्यासाठी असे केले असले तरी त्याच्या मागे इतरही कारणे आणि गणितं आहेत. 2013 मध्ये मंत्रिमंडळाने पारित केलेला प्रस्ताव राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत फाडला होता. यावेळीही एक व्यक्ती एक पद या मुद्द्यावर जाहीररीत्या मतप्रदर्शन करून त्यांनी गेहेलोत यांना एक प्रकारे जागा दाखवून दिली होती. हा संदेश जाहीररीत्या न देता खासगीतून पण देता आला असता. परंतु गांधी या आडनावातच हा झोल दिसतोय. स्वतः ला पडलालासा नसल्याची दाखवायची .परंतु सूत्र मात्र हाती ठेवायची. दैनंदिन कामकाजातून स्वतः नामनिराळे होऊन पण स्वतःची लार्जर देन लाईफ प्रतिमा निर्माण करायची आणि जपायची. आता राहुल हे काँग्रेस चे 52 पैकी एक खासदार. त्यांना नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करायची गरज होती का? किंवा निदान तसे सार्वजनिकरित्या दाखवण्याची गरज होती का? पण वर म्हटल्याप्रमाणे गांधी किडे नडतात. आता कशी सणसणीत थोबाडात बसली? सोडावं म्हणावं हा गुंता . आता बिळात जाणार!
गेहेलोत यांची ही एक प्रकारे गांधी कुटुंबीयांना चपराक आहे. मनमोहन सिंग आज खूप आनंदित असतील नक्कीच. याचे परिणाम दुरगामी आहेत. असं गृहीत धरलं की यात गांधी कुटुंबीयांचा काही हात नाही( त्या बाबत खाली लिहिले आहे) तर, काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत सर्वात प्रबळ उमेदवार असून सुद्धा हे सगळे होऊन ही जर गेहेलोत यांना उमेदवार केले आणि गांधी कुटुंबीयांनी पाठिंबा दिला तर ते दुबळे दिसणार. राजकारणात ऑप्टिक महत्त्वाचे असते. फायदा गेहेलोत यांना होणार. गेहेलोत यांचे पारडे पहिल्यापासूनच जड असेल. अणि पुढे मागे ते कुरघोडी करणार हे नक्की. बरं एवढा देखावा करून निवडून आणलेल्या अध्यक्षाला असंच तर नाही ना काढू शकत? सीताराम केसरीना काढले तो काळ वेगळा होता. हे 1998 नाही अणि गेहेलोत काही केसरी नाहीत. म्हणजे मग गांधींना पुढील काही वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल. बरं जर गेहेलोत यांच्या उमेदवारीला पाठिंबा नाही दिला तर ते तर मुख्यमंत्री पदी कायम राहतील. परंतु काँग्रेस ला नवीन अध्यक्ष हुडकावा लागेल. म्हणजे बेइज्जती त्यात पण आलीच! थोडक्यात चित मै जिता पट तू हारा अशातला प्रकार आहे. अणि या प्रकरणाद्वारे गेहेलोत यांनी एका राज्याचे मुख्यमंत्रीपद हे काँग्रेस अध्यक्षपदापेक्षा महत्त्वाचे हेच दाखवून दिले आहे. ती बेअब्रू वेगळीच!
आता या सगळ्यात आणखी एक शक्यता अशी की ही मॅच फिक्सिंग असू शकते. पायलट यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर ठेवण्याकरिता गेहेलोत अणि गांधींनी योजनाबद्धरित्या हे सर्व घडवून आणले आहे. तसे असेल तर येत्या दिवसात कळेलच. गेहेलोत यांच्या उमेदवारीला गांधी किती प्रोत्साहन देतात यावरून अंदाज येईल की त्यांची बंडाळी ही स्वनिर्मित होती की गांधी संचालित. परंतु तसे जरी असले तरीही गेहेलोत फारच शहाणे निघाले म्हणायचे! पक्ष नेतृत्वाला सोबत घेऊन स्वतःला हवे तसे करवून घेतले! त्या अनुषंगाने पण गेहलोत हे गांधींना डोईजड होतीलच आज ना उद्या. शिवाय तसे असेल तर पायलट यांचा बंडाळी करण्याचा मार्ग मोकळा. परंतु लगेच तसे करायला किंवा करवून आणायला भाजप काही मूर्ख नाही. एका वर्षाने राजस्थानात निवडणुका आहेत. तिथला इतिहास पाहता कुठलाही पक्ष दुसऱ्यांदा निवडून येत नाही. म्हणजे भाजपला निश्चित चान्स आहे या वेळी. मग ते पायलट यांना का घेतील?किंबहुना घेऊन काही फायदा नाही. त्यांच्या समर्थकांना तिकीट द्यावे लागेल ते वेगळेच. त्या पेक्षा ते पायलट यांना काँग्रेस मध्येच राहण्याचे सल्ले देऊन आतून पोखरून काढायला लावतील. पुढे वसुंधरा राजेंना काटशह म्हणून मग पायलट यांना आणतील!गेहेलोत यांचे खेळून झाले. आता पायलट कसे उत्तर देतात ते बघायचे.
असो..मला ही नेहमी विचारते तुला राजकारण इतकं का आवडते. तर त्याचे उत्तर असे की - यहाँ पे क्या नही हैं? ॲक्शन हैं, ड्रामा हैं , सस्पेन्स हैं , रोमान्स हैं और तो और शतरंज भी तो हैं ! और क्या मंगता ?
सुशांत गोसावी
२५- सप्टेंबर 2022